दैनिक चालू घडामोडी - MPSC Daily Current Affairs 30 September 2022

By Ganesh Mankar|Updated : September 30th, 2022

चालू घडामोडी हा कोणत्याही स्पर्धा परीक्षांमधील एक महत्त्वाचा घटक आहे.चालू घडामोडी या एमपीएससी राज्यसेवाएमपीएससी संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षामहाराष्ट्र आरोग्य भरती परीक्षा आणि इत्यादी परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

The following daily current affairs news is taken from reliable sources like PIB, AIR News, Loksatta, The Hindu, and Indian Express. You can also download the current affairs PDF in Marathi & English.

byjusexamprep

Table of Content

दैनिक चालू घडामोडी 30.09.2022

महत्त्वाच्या बातम्या : राष्ट्रीय

MoHUA ने स्वच्छ टॉयकॅथॉन लाँच केले

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने, राष्ट्रीय खेळणी कृती आराखडा 2020-एनएपीटी जाहीर केला आहे. यात पारंपरिक हस्तकौशल्ये आणि हातांनी तयार केलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन देण्याचाही विचार असून त्याद्वारे भारताला खेळणी उद्योगांचे जागतिक केंद्र बनवण्याचा उद्देश आहे. उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने,केंद्र सरकारच्या 14 मंत्रालयांसह ह्या एनएपीटी च्या अंमलबजावणीचे काम सुरु केले आहे.

मुख्य मुद्दे:

  • “स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत” ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.17 सप्टेंबर-सेवा दिवस ते 2 ऑक्टोबर 2022 स्वच्छता दिवस या पंधरवड्यात हा महोत्सव साजरा केला जात आहे.
  • “माय गव्ह इनोव्हेट इंडिया” पोर्टल वरुन ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
  • भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, तसेच देशांत युवा लोकसंख्येचं प्रमाण अधिक, म्हणजे देशातली अर्धी लोकसंख्या 25 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. 
  • अर्थव्यवस्थेत होत असलेल्या प्रगतीमुळे लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, आजकाल मुलांसाठी अभिनव खेळणी तयार केली जात आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे देशांत खेळण्यांची मागणी देखील वाढते आहे.
  • एकीकडे देशांत खेळण्यांची मागणी वाढते आहे, तसेच दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, ह्या दोन्ही समस्यांवर एकच समाधान शोधण्यासाठी ‘स्वच्छ टॉयकॅथोन’ ही अभिनव कल्पना राबवली जाणार आहे.
  • ह्या स्पर्धेअंतर्गत, कचऱ्यापासून खेळणी बनवण्यासाठी संशोधन करत नवे मार्ग शोधले जाणार आहेत. ही स्पर्धा, सर्व लोक आणि गटांसाठीही खुली असून सुक्या कचऱ्यापासून खेळणी बनवण्याच्या कल्पना यात मांडायच्या आहेत. 
  • या स्पर्धेत, अशा संरचनांची निवड करण्याला प्राधान्य असेल, ज्यातून मोठ्या प्रमाणावर खेळणी तयार करण्यासाठी त्याच्या व्यापक आवृत्ती तयार केल्या जातील, तसेच त्यात सुरक्षिततेचे सगळे निकष पूर्ण केले जातील. 
  • तसेच खेळण्याच्या सौंदर्याकडे लक्ष दिले जाईल. ह्या उपक्रमात, आयआयटी गांधीनगर इथले सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग नॉलेज पार्टनर असेल.

स्रोत: PIB

अविवाहित महिलांनादेखील सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

byjusexamprep

  • भारतातील अविवाहित महिलांनाही MTP (Medical Termination of Pregnancy Act) कायद्यानुसार, गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भारतातील सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 
  • एवढंच नाहीतर, भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यांतर्गत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलंय. या निर्णामुळे अविवाहित महिलांनाही 20-24 आठवड्यांच्या दरम्यान गर्भपात करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान, एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. यानिर्णयांतर्गत आता अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयानं Medical Termination of Pregnancy Act चा नियम 3-B मध्ये सुधारणा केली आहे. 
  • यापूर्वी, 20 आठवड्यांपेक्षा जास्त आणि 24 आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त विवाहित महिलांनाच होता. 
  • आता हा अधिकार अविवाहित महिलांनाही देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 
  • भारतातील गर्भपात कायद्यानुसार, विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. गर्भपाताच्या उद्देशानं होणाऱ्या बलात्कारात वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो. 
  • तसेच, अत्याचारानंतर होणारी गर्भधारणा आणि कुमारी मातांच्या गर्भधारणेचाही समावेश होतो. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) कायद्यांतर्गत अविवाहित महिलांना लिव्ह-इन रिलेशनशिपमधून वगळणं म्हणजे, असंवैधानिक आहे. 
  • कलम 21 अंतर्गत मुल जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनियतेचा अधिकार विवाहित स्त्रियांसोबतच अविवाहित स्त्रियांनाही समान हक्क देतो, असंही सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे. 
  • 20-24 आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा असलेल्या अविवाहित किंवा अविवाहित गर्भवती महिलांना गर्भपात करण्यास मनाई करणं आणि अशा परिस्थितीत विवाहित महिलांना परवानगी देणं हे घटनेच्या कलम 14 चं उल्लंघन आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 
  • समाजातील संकुचित पितृसत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Source: ABP Maza

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन 

byjusexamprep

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले.
  • मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती.

महाराष्ट्राची विजयी घोडदौड

  • महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी, रग्बी, टेनिस या खेळांमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी रग्बी सेव्हन्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. नेमबाजीमध्ये रुद्रांक्ष पाटील आणि आर्या बोरसे यांनी सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

Source: Loksataa

सहा एअरबॅगची सक्ती 1 ऑक्टोबर 2023 पासून 

byjusexamprep

  • प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅगची सक्ती करण्याचा निर्णय सरकारने एका वर्षांने लांबणीवर टाकला आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
  • जागतिक पुरवठा साखळीतील समस्यांमुळे सहा एरअर बॅग निर्देश पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे हा नियम आता 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने आठ आसनी वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज बसवणे बंधनकारक केले होते. हा आदेश 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता.

Source: Loksatta

देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन

byjusexamprep

  • देशाला मिळणार तिसरी ‘वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 
  • ही ट्रेन गुजरातच्या गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे. 
  • यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश उपस्थित राहणार आहेत. 
  • भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ही असणार आहे.
  • ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुविधा पाहता अनेक बदल करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 1 हजार 128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.

या ट्रेन मध्ये काय सुविधा असणार आहेत?

  • ही ट्रेन अवघ्या 52 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.ही ट्रेन पूर्णपणे एसीअसणार आहे. 
  • याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, या ट्रेनमध्ये असणार आहेत. 
  • ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

  1. पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर धावली. 
  2. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली. 
  3. आज तिसरी वंदे भारत ट्रेन गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यानही धावणार आहे.

Source: Lokshahi

महत्त्वाच्या बातम्या : राज्य

सुरजापुरी आणि बज्जिका या भाषांच्या संवर्धनासाठी बिहारची विशेष मोहीम

byjusexamprep

  • बिहारमधील सरकार येथील सुरजापुरी आणि बज्जिका या स्थानिक बोलीभाषांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष अकॅडमींची स्थापना करणार आहे.
  • या केंद्रांच्या माध्यमातून सुरजापुरी आणि बज्जिका या भाषांच्या संवर्धनावर काम केले जाणार आहे. या आदेशानुसार बिहारमधील शिक्षण विभाग एका मुख्य संस्थेचीही स्थापना करणार आहे. 

सुरजापुरी आणि बज्जिका या बोलीभाषा काय आहेत?

  • सुरजापुरी ही भाषा हिंदी, उर्दू आणि बांगला या भाषांचे मिश्रण आहे. ही भाषा विशेषत्वाने किशनगंज तसेच ईशान्य बिहारमधील सीमांचल प्रदेशात बोलली जाते. 
  • सीमांचलमधील कटिहार, पूर्णिया, अररिया या भागात सुरजापुरी ही भाषा बोलणारे लोक आढळतात. सुरजापुरी ही भाषा सुरजापुरी मुस्लीम समाजामध्ये बोलली जाते. किशनगंज भागात हे सुरजापुरी मुस्लीम आढळतात. 
  • सुरजापुरी बोलणारे लोक बिहारमधील ठाकूरगंज भागातील पूर्णिया जिल्ह्याला लागून असलेल्या नेपाळमधील झापा जिल्ह्यातही आढळतात.
  • 2011 मधील जनगणेनुसार बिहारमध्ये 18 लाख 57 हजार 930 लोक सुरजापुरी या भाषेत बोलतात. मैथिली भाषेप्रमाणेच बज्जिका ही भाषादेखील बिहारमधील वायव्य भागातील लोक बोलतात.
  • बिहारमध्ये याआधी आठ भाषांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आठ वेगवेगळ्या अकॅडमी आहेत. बिहार हिंदी ग्रंथ अकॅडमी, मैथिली अकॅडमी, मागाही अकॅडमी, बांगला अकॅडमी, संस्कृत अकॅडमी, भोजपुरी अकॅडमी, अंगिका अकॅडमी, दक्षिण भारतीय भाषा संस्था, अशा बिहारमधील आठ अकॅडमींची नावे आहेत.

Source: Loksatta

बुंदेलखंडच्या पहिल्या व्याघ्र प्रकल्पाला उत्तर प्रदेश सरकारने मान्यता दिली

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • बुंदेलखंड प्रदेशातील पहिल्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

मुख्य मुद्दे:

  • व्याघ्र प्रकल्प 52,989.863 हेक्टर जमिनीवर पसरलेला असेल, ज्यामध्ये 29,958.863 हेक्टर बफर क्षेत्र आणि 23,031.00 हेक्टर कोर क्षेत्र समाविष्ट आहे.
  • राज्याच्या चित्रकूट जिल्ह्यातील राणीपूर वन्यजीव अभयारण्य म्हणून व्याघ्र प्रकल्पाला आधीच अधिसूचित करण्यात आले होते.
  • उत्तरेकडील उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी जंगलांनी व्यापलेला राणीपूर व्याघ्र प्रकल्प हा वाघ, बिबट्या, अस्वल, ठिपकेदार हरीण, सांबर, चिंकारा, सरपटणारे प्राणी आणि इतर सस्तन प्राण्यांसाठी ओळखले जाते.

स्रोत: इंडियन एक्सप्रेस

उत्तर प्रदेशने आयुष्मान उत्कृष्टता पुरस्कार 2022 जिंकला

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • आरोग्य सुविधा रजिस्टरमध्ये विविध आरोग्य सुविधा जोडल्याबद्दल उत्तर प्रदेशला आयुष्मान उत्कृष्टता पुरस्कार 2022 देण्यात आला आहे.

मुख्य मुद्दे:

  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), RS शर्मा यांनी 26 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेल्या आरोग्य मंथनाच्या समारोप समारंभात उत्तर प्रदेश राज्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या राष्ट्रीय आरोग्य सुविधा नोंदणीमध्ये 28728 आरोग्य सुविधांचा समावेश करून उत्तर प्रदेश हे देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य आहे.
  • तसेच, उत्तर प्रदेश हे आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) बनवण्यात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून सुमारे 2 कोटी खाती आहेत.
  • आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) ची सुरुवात पंतप्रधानांनी 27 सप्टेंबर 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली होती.

स्रोत: टाईम्स ऑफ इंडिया

ओडिशातील आदिवासींचा विश्वकोश

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशामधील आदिवासींचा विश्वकोश प्रकाशित केला आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • "ओडिशातील आदिवासींचा विश्वकोश" या पाच खंडांच्या प्रकाशनासह आदिवासी लोकांवर ज्ञानकोश प्रकाशित करणारे आणि त्यांचा इतिहास आणि विशिष्ट परंपरा नोंदवणारे ओडिशा हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (SCSTRTI) आणि ओडिशा राज्य आदिवासी संग्रहालय यांनी संयुक्तपणे विश्वकोश प्रकाशित केला.
  • विश्वकोशात आदिवासी समुदायांवरील 418 संशोधन लेखांपैकी 13 विशेषतः असुरक्षित गटांचा समावेश आहे.
  • 3,800 पानांचे विश्वकोशीय शैक्षणिक पुस्तक हे असंख्य शैक्षणिक आणि प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञांच्या संशोधन योगदानाचा कळस आहे.
  • राज्यातील आदिवासी जमातींच्या झपाट्याने बदलणाऱ्या सांस्कृतिक ओळखांचे जतन करणे हे विश्वकोश पुस्तकाचे ध्येय आहे.
  • ओडिशाची संपूर्ण लोकसंख्या 22.85% आदिवासी लोकांची आहे.
  • ओडिशामध्ये 62 विविध जमातींचे निवासस्थान आहे, ज्यामुळे ती संपूर्ण भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृतींपैकी एक आहे.

स्रोत: जनसत्ता

महत्वाचे दिवस

अन्नाचे नुकसान आणि कचरा 2022 बद्दल जागरुकता आंतरराष्ट्रीय दिवस

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • तिसरा आंतरराष्ट्रीय अन्न नुकसान आणि कचरा जागरूकता दिवस (IDAFLW) 29 सप्टेंबर 2022 रोजी साजरा केला गेला. 

मुख्य मुद्दे:

  • अन्नाची हानी आणि कचरा (FLW) कमी करणे, हवामानातील बदल कमी करणे आणि अन्न सुरक्षा आणि पोषण वाढवणे यासाठी अन्न प्रणालीच्या सार्वजनिक आणि व्यावसायिक संस्था तसेच ग्राहकांना आकर्षित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
  • 2022 च्या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम आहे Stop Food Loss and waste, for the people, for the planet
  • 19 डिसेंबर 2019 रोजी, 29 सप्टेंबर हा संयुक्त राष्ट्र महासभेने अन्नाचे नुकसान आणि कचर्‍याबद्दल जागरुकतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केले.
  • अन्न नासाडी आणि कचऱ्याचा आंतरराष्ट्रीय दिवस ही सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांसाठी संसाधन कार्यक्षमता सुधारण्यासाठी, हवामानातील बदल कमी करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा आणि पोषणाला समर्थन देण्यासाठी अन्नाची हानी आणि कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न आणि उपक्रमांना प्राधान्य देण्याची संधी आहे.
  • शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना आणि सामूहिक कृतीला प्रोत्साहन देणे हा आंतरराष्ट्रीय अन्न नासाडी आणि कचरा दिनाचा उद्देश आहे.

स्रोत: इंडियन एक्सप्रेस

जागतिक हृदय दिन 2022

byjusexamprep

बातम्यांमध्ये का:

  • जागतिक हृदय दिन दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो.

मुख्य मुद्दे:

  • हृदयविकारांपासून बचाव करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.
  • जागतिक हृदय दिन 2022 ची थीम "Use a Heart for Every Heart" अशी आहे.
  • जागतिक हृदय दिनाची कल्पना वर्ल्ड हार्ट फेडरेशनचे अध्यक्ष (1997 ते 1999) अँटोइन बेयस डी लुना यांनी मांडली होती
  • पहिला जागतिक हृदय दिन 24 सप्टेंबर 2000 रोजी साजरा करण्यात आला.

स्रोत: इंडियन एक्सप्रेस

महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र विशेष

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना लोक प्रशासन पुरस्कार

byjusexamprep

  • भारतीय लोकप्रशासन संस्थेच्यावतीने देण्यात येणारा लोकप्रशासन 2021-2022 मधील नवोपक्रमासाठीचा ‘स्व.डॉ. एस एस. गडकरी स्मृती’ पुरस्कार गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना जाहीर करण्यात आला.
  • मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यामध्ये हा पुरस्कार घोषित करण्यात आला. 

Source: Mahasamvad

मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी स्वतंत्र कुलगुरु निवड समित्या गठीत

byjusexamprep

  • राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. 
  • मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. 
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरता कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी, तर कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली आहे.

Source: AIR

आजच्या संपूर्ण चालू घडामोडी तुम्हाला खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळतील. या घटकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी, येथे क्लिक करा:

दैनिक चालू घडामोडी-30 September 2022, Download PDF

Daily Current Affairs-30 September 2022, Download PDF 

More From Us:

MPSC Free Exam Preparation

Maharashtra Static GK 

MPSC Current Affairs 2022: Download in Marathi & English

Important Government Schemes For MPSC 

NCERT Books for MPSC State Exam 2022

Maharashtra State Board Books PDF

MPSC GK Study Material: Complete Notes for MPSC Exam [Free]

Download BYJU'S Exam Prep App

Comments

write a comment

Follow us for latest updates